पुन्हा बाबा रामदेवांचा हल्लाबोल

स्रोत: तरुण भारत 
फारूखाबाद, ३ ऑक्टोबर
भ्रष्टाचार आणि विदेशात असणारा काळा पैसा परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या  निष्क्रियतेवर पुन्हा एकदा रामदेव बाबांनी हल्लाबोल केला आहे. जे लोक काळा पैसा परत आणण्यात बाधा आणत आहेत, त्यांचाच काळा पैसा या विदेशी बँकांमध्ये जमा असून शकतो, अशी टीका केंद्र सरकारवर रामदेव बाबांनी केली आहे.
‘भारत स्वाभिमान यात्रा’वर असणार्‍या रामदेवबाबांनी आज सकाळी योगशिक्षण दिल्यानंतर केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. काळा पैसा भारतात परत आणण्यामध्ये अडचणी आणणार्‍या लोकांचाच पैसा विदेशी बँकांमध्ये जमा असू शकतो. असे नसते देशाच्या विकासासाठी हा पैसा परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असते.
भ्रष्टाचाराचा मुद्दा खूप मोठा असून या भ्रष्टाचारात अडकलेल्या मोठ्या लोकांची नावे आश्‍चर्यकारकपण समोर येत आहेत. भ्रष्टाचाराने देश पोखरत चालला आहे. देशात वाढणार्‍या महागाईचे कारणदेखील भ्रष्टाचारच आहे. निष्क्रिय लोकांच्या हाती देशाची सत्ता असल्याचेही बाबा रामदेव यांनी सांगितले.
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Monday, October 3, 2011,
Filed under - , ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS